Saturday 20 March, 2010

मुलांचे प्रश्न आणि पालक


त्रिमिती बाराखडी दिल से या संस्थेच्या वतीने १९ व २० मार्च असे दोन दिवस स्वप्नांना देऊ नवी दिशाया विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दोन दिवसांमध्ये परिसंवाद, मुलाखत, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले शनिवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले येथे स्वप्नांना देऊ नवी दिशाया विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या हस्ते होणार झाले. त्यानंतर ६.३० ते रात्री ८ दरम्यान मुलांचे प्रश्न आणि पालकया विषयारील परिसंवादात सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी, लेखिका डॉ. विजया वाड, अभिनेता आदेश बांदेकर, दिग्दर्शक अमोल गुप्ते सहभागी झाले होते. पालकाच्या भूमिकेत अभिनेता आदेश बांदेकर सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अस्मिता पांडे यांनी केले

या परिसंवादात बोलताना अमोल गुप्ते म्हणाले की मुलांच्या भावविश्वात डोकावून बघीतलं तर असं लक्षात येतं की मुलांना त्यांच बालपण व्यक्त करायला आपण संधीच देत नाही. ती वेळ येई पर्यंत बालपण संपलेलं असतं. तर आदेश बांदेकर म्हाणाले की आपल्या पेक्षा आताच्या मुलांचं बालपण अधिक खडतर आहे. आपच्या आई-वडीलांनी आम्हाला खुप स्वातंत्र्य दिलं. मुलांना खेळू द्या, मजा करूद्या असं सांगून डॉ. हरिश शेट्टी म्हणाले की मुलांना मुलासारखं वागूद्या, जगूद्या. डॉ. विजया वाड म्हणाल्या की मुलांना खुप प्रेमाची आवश्यकता आहे. त्यांच्या अपयशातही पालकांनी सहभागी झालं पाहिजे.

या प्रसंगी बोलताना आमदार डॉ. दीपक सावंत म्हणाले की त्रिमितीला समाजात विधायक बदल घदवायचा आहे. असे कार्यक्रम हे त्याचच द्योतक आहे.

      

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails