लातूर गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या माया सोरटे या सद्ध्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. ‘महिला राजसत्ता आंदोलना’च्या त्या एक धडाडीच्या कार्यकर्त्या. त्यानी राजकारणात प्रवेश केला आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. ग्रामपंचयतीची निवडणूक असली तरी त्याना ती तेवढी सोपी नव्हती. ज्या पक्षात त्यानी प्रवेश केला त्याच पक्षाने त्यांची अडवणूक केली, पेच प्रसंग उभे केले, पण त्या सगळ्याला मायाताई पुरून उरल्या. पुरूषी अहंकाराचा सामना करत राजकारणात ताठ मानेने उभ्या राहिल्या. त्यांचं स्वप्न आहे ते आमदार व्हायचं. ‘मी आमदार होणार’ ही त्यांची जिद्द आहे. मायाताईंची धडाडी आणि संघर्ष पाहून खरच वाटतं त्या आमदार व्हाव्या. लोकसत्तच्या चतुरंग पुरवणीत मायाताईंवर आलेला हा लेख वाचा:
असा खयंच नाय खावक
-
Audio Link असा खयंच नाय खावक मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाकअरे
चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक घावणे, आंबोळ्यो, खापरोळी आणि
ताटाभोवतीच...
1 year ago
0 comments:
Post a Comment